⚡ ब्रेकिंग News

अपहरण झालेला मुलगा सुखरूप घरी परतला


 *मुख्य संपादक (जनार्दन गायकवाड): सिन्नर, जिल्हा नासिक - सिन्नर शहरातील उद्योजक तुषार कलंत्री यांचा, मुलगा चिराग तुषार कलंत्री वय( वर्ष १० ) दिनांक ५ जानेवारी रोजी संध्याकाळी,५:३० वाजेच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना, काही अज्ञात अपहरणकर्त्यांनी, सफेद कलरच्या नंबर नसलेल्याओमिनी व्हॅन मधून पळवून नेला होता. यासंदर्भात सिन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असता.सिन्नर पोलिसांनी जीवाचे रान करून संपूर्ण परिसरात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत हे शोध कार्य सुरू होते. त्यातच सर्व सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून चिराग चा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. त्यातच अचानक रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी चिरागला, घराच्या परिसराच्या आसपास रात्रीच्या अंधारात आणून सोडून दिले. चिरागच्या वडिलांच्या सांगण्यावरून अपहरणकर्त्यांनी तोंडाला मास्कच्या साह्याने संपूर्ण कव्हर केलेले होते. त्यामुळे चिराग कोणालाही ओळखू शकला नाही अशी माहिती दिली. मात्र यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सिन्नर पोलिसांना आता अतिशय दक्ष राहावे लागणार आहे. चिराग घरी परतल्याने परिवारातील, सर्व परिजनांना अत्यंत आनंद झालेला आहे. पुढील तपास सिन्नर पोलीस करत आहेत.*

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...